मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१६

Valentine दिवस !

Valentine दिवसाचा बरेच दिवस चाललेला कल्लोळ काल एकदाचा संपला. "शब्दावाचुन कळले सारे" चे दिवस कधीच संपले. कधी काळी केलेल्या आणि फक्त दोघांत गुपित म्हणुन हृदयाशी जपुन ठेवलेल्या प्रितीचे दिवस केव्हाचेच सरले.   

जमाना बदलला. तरुणाईसोबत ज्यांचे लौकिकार्थाने प्रेम करण्याचे दिवस सरले असे लोक सुद्धा ह्या कल्लोळात सामील होऊ लागले. हे विधान स्फोटक आहे. प्रेम करण्याचे दिवस कधीच सरत नाहीत असं मानणाऱ्या सदाहरित लोकांचा जमाना आहे हा! मोठा सखोल विषय आहे हा! प्रेम म्हणजे नक्की काय असतं ह्यावर मोठमोठ्या दिग्गजांनी विश्लेषण केलं आहे

पूर्वीच्या काळातील काही प्रेमं तशी अव्यक्तच राहिली. कधी ते कोणाच्या हास्यावर फिदा झाल्याने झालेलं ते प्रेम होतं , तर कधी कोणाचे डोळे आवडल्याने झालेलं ते प्रेम होतं. ते वयच असं होतं  की आपलं कोणीतरी असावं अशी भावना प्रबळ झालेली असते दोघं दुर गेले ते परत न भेटण्यासाठी आणि एकमेकांची त्या वयातील प्रतिमा, रम्य आठवणी कायम ठेऊन! आयुष्याच्या सायंकाळी सुद्धा डोळ्यात दोन आसवं आणण्याची क्षमता देणारं हे प्रेम होतं. हे अव्यक्त प्रेम असंच राहून देण्यातच जी गहराई आहे ती कशात नाही!

ह्या उलट आत्ताच! कोणाला पाहुन हृदयाचा अर्धा एक ठोका चुकतो , न चुकतो काय आणि मग सर्वांना झाली प्रेम व्यक्त करण्याची घाई! मागच्या पिढीने केवळ कल्पिलेल्या प्रेम व्यक्त करण्याच्या सर्व पातळ्या काही दिवसात पार पाडून होतात आणि मग सुरु होतो तो परीक्षणाचा काळ! आणि मग ह्या परीक्षणाच्या कसोटीला मात्र बरीच प्रेमं यशस्वीरित्या तोंड देऊ शकत नाहीत. बहुदा मागच्या पिढीतील सुद्धा देऊ शकली नसती. पण होतं काय आयुष्यभर जी प्रतिमा जपायची, ज्या आठवणी जपुन ठेवायच्या त्यांचा चक्काचुर होण्याचीच शक्यता वाढीस लागते

सांख्यिकीदृष्ट्या विचार केला तर तरुणाई एका दशकाची तर बाकीचं आयुष्य त्यामानानं मोठं

शेवटी प्रश्न प्राध्यान्यक्रमाचा आहे! क्षणिक मदहोष सुखं उपभोगायचं की आयुष्यभराच्या आठवणीचा अनमोल ठेवा घेऊन जगायचं ! हा दोन पिढींतील फरक! मला चिंता वाटते ती हल्लीच्या पिढीतील बहुसंख्य तरुणाईची! आयुष्याच्या सायंकाळी कोणत्या आठवणी त्यांना जपाव्या लागतील? 

नवीन पिढीच्या वरील वर्णनाला अपवाद असणारे अनेक प्रतिनिधी असतील, त्यांनी ह्या वर्णनाबद्दल मला क्षमा करावी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...