मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०१४

अमिताभ आणि रेखाचा एकत्र हवाईप्रवास - एक कल्पनाविलास!



आपण हल्ली कसं विविध गोष्टींच्या सीमारेषा नीटशा आखून घेतो. आयुष्यात पुरेसा गंभीरपणा, ताणतणाव वाढला असल्याने आपणास बाकी कोणत्या गोष्टीत जास्त गंभीरपणा खपत नाही. चित्रपट, कथा, पेपर सर्व कसे हलकेफुलके असावे असं आपलं मत बनलं आहे. त्यामुळेच आजकालची वर्तमानपत्रे सुद्धा बरीच बदलली आहेत.
परवाच्याच पेपरात (हो राष्ट्रीय पातळीवरील पेपरात!) अमिताभ आणि रेखाने एकत्र केलेल्या हवाई प्रवासाची बातमी वाचनात आली. रेखा अमिताभच्या मागच्या सीटवर बसली होती आणि फोटो काढला जातोय हे समजताच तिने आपला चेहरा वळवायचा प्रयत्न केला असल्याचे जाणवते. आता ब्लॉगचा विषय काय? त्या दोघांनी एकत्र प्रवास केला हा की ही बातमी राष्ट्रीय पातळीवरील पेपरात छापून येणे कितपत योग्य आहे हाब्लॉगसाठी हा विषय निवडणे किती योग्य आहे हा ही माझ्यासाठी मननाचा मुद्दा!
असो समजा ही बातमी खरी समजली तर अमिताभच्या मागच्या सीटवर बसलेल्या रेखाच्या मनात कोणते विचार आले असतील हा आजच्या ब्लॉगचा विषय!

प्रथम अमित आपल्या पुढील सीटवर बसणार हे समजताच तिला धक्का बसला असणार! मग पहिला विचार आला असणार तो 'ये कहाँ गए हम, यूँ ही साथ साथ चलते' ह्या गाण्याचा, म्हणजे थोडा बदल करून 'ये कहाँ गए हम, यूँ ही अलग अलग चलते' बाकी पहिलं कडव जसच्या तसं राहिलं असतं , बदल इतका की ते रेखाच्या शब्दात आलं असतं 

मैं और मेरी तनहाई, अक्सर ये बाते करते हैं
तुम होते तो कैसा होता
तुम ये कहते , तुम वो कहते
तुम इस बात पे हैरान होते
तुम उस बात पे कितना हँसते
तुम होते  तो ऐसा होता, तुम होते  तो वैसा होता
मैं और मेरी तनहाई, अक्सर ये बाते करते हैं

विमानाने आकाशात उड्डाण केल्यावर तिला खिडकीतून निळे आकाश दिसलं असणार. मग तिला सिलसिलामधील दुसरे गीत आठवलं असणार. ते गीत रात्रीचं असलं आणि प्रवास दिवसाचा असला म्हणून काय झालं, गाणं तर आठवणारच!

नीला आसमान सो गया -2
हवा का गीत माध्यम है -2
समय की चाल भी कम है
नीला आसमान सो गया -2

फोटोग्राफर ज्यावेळी फोटो काढण्यासाठी आला असणार त्यावेळी रेखाने लोक काय म्हणतील असा विचार मांडला असेल. तेव्हा अमिताभने मिस्टर नटवरलाल मधील हे कडवे बोलून दाखवले असणार 

लोगो को कहने दो कहते ही रहने दो 
सच झूट हम क्यू सबको बता दे 
तू भी है  मस्ती में मै भी हु मस्ती मै 
इस ख़ुशी मै हम नाचे गाये 
किसको पता क्या किसने किया 
सब कहते के मैने तुमको दिल दे दिया

बाकी मग विमान उतरण्याच्या वेळी रेखा भावूक झाली असणार आणि तिला नक्कीच उमराव जान मधील हे  गाणे  आठवले  असणार

जुस्तजू जिस की थी उस को तो ना पाया हम ने
इस बहाने से मगर देख ली दुनियाँ हम ने

तुझ को रुसवा ना किया, खुद भी पशेमान हुए
इश्क की रस्म को, इस तरह निभाया हम ने

कब मिली थी, कहा बिछडी थी, हमे याद नहीं
जिन्दगी तुझ को तो बस ख्वाब में देखा हम ने

अदा और सुनाएं भी तो क्या हाल अपना
उम्र का लंबा सफ़र, तय किया तनहा हम ने

मग अमिताभने हे गाणे म्हणून तिची समजूत काढली असणार

जिन्दगी जब भी तेरी बज़्म में लाती हैं हमे
ये ज़मीं चाँद से बेहतर नजर आती हैं हमे

सुर्ख फूलों से महक उठती हैं दिल की राहें
दिन ढले यूँ तेरी आवाज बुलाती हैं हमे

याद तेरी कभी दस्तक, कभी सरगोशी से
रात के पिछले पहर रोज जगाती हैं हमे

हर मुलाक़ात का अंजाम जुदाई क्यों हैं
अब तो हर वक़्त यही बात सताती हैं हमे

आता हा प्रवास खरोखर झाला कि नाही माहित नाही पण चांगली गाणी मात्र ह्या निमित्ताने आठवली! अमित रेखाच्या वैयक्तिक जीवनात डोकावल्याबद्दल त्यांची माफी मागतो

अमिताभजीना  वाढदिवसाच्या शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...